रत्नागिरी जिल्ह्यात आनंद शिध्याचे  ६७ टक्के वितरण


रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशीही आनंद शिध्याचे वितरण सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजार ३८९ इतके आनंद शिध्याचे संच वितरित करण्यात आले. आजपर्यंत मागणी केलेल्या आनंद शिध्यापैकी ६७ टक्के इतके वितरण पूर्ण झाल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना आनंद शिध्याचे वितरण झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून राज्यात दिपावलीनिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्यात येत आहे. यामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल,  चणाडाळ, रवा, मैदा, पोहे (प्रत्येकी अर्धा किलो) असे सहा जिन्नस १०० रू. च्या एका संचात समाविष्ट आहेत. प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय अन्न योजना पात्र शिधापत्रिका धारकांना हा संच राशन धान्य दुकानात मिळत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button