देवरूखमधील वर्षभरात निधन पावलेल्या ७५ व्यक्तींच्या कुटुंबांना आमदार भास्कर जाधव यांनी पाठवला दिवाळीचा फराळ


संंगमेश्वर तालुक्यातील देवरूखमधील यावर्षी निधन पावलेल्या ७५ व्यक्तींच्या कुटुंबांना शिवसेना ठाकरे गटाचे नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दिवाळीचा फराळ पाठवून त्यांची दिवाळी गोड केली आहे. तसेच या सर्व कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याच्या सांत्वनपर पत्रातून आमदार भास्कर जाधव यांनी या कुटुंबाप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देवरूख नगरपंचायत हद्दीतील कांजिवरा, पर्शुरामवाडी, बागवाडी, दत्तनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, बोटकेवाडी, कोल्हेवाडी, अमृतनगर, वरचीआळी, मधलीआळी, खालचीआळी, क्रांतीनगर, तांबळवाडी, कुंभारवाडी, हसमवाडी, मांडवकरवाडी, आंबेडकरनगर, घोरपीवाडी, मुस्लीम मोहल्ला येथील ७५ जणांचा वर्षभरात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या दुःखद घटनेमुळे या कुटुंबामध्ये दिवाळीचा सण साजरा होणार नाही. याची कल्पना आपल्याला आहे. आपले दुःख हे मी माझे दुःख समजतो.
त्यामुळे कुटुंबातील एक सदस्य या नात्याने माझ्याबरोबर आपणदेखील ही दिवाळी साजरी करावी, या भावनेतून हा फराळ पाठवत असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी या प्रत्येक कुटुंबाला पाठवलेल्या सांत्वनपर पत्रात म्हटले आहे. तर हा फराळ व सांत्वनपर पत्र शिवसेना ठाकरे गटाचे संंगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर यांच्या मार्गदर्शनाखाली व देवरूख युवा सेनेच्या पुढाकाराने मुन्ना थरवळ, युवासेनेचे तेजस भाटकर, इस्त्याक कापडी, बाबू मोरे, ओंकार सुर्वे, दिपेश गजबार, सचिन चव्हाण या कार्यकर्त्यांनी या सर्व कुटुंबांना पोहोच केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button