खाद्यान्न परवाना नूतनीकरणाची मुदत आता पुन्हा पाच वर्षे


फूड सेफ्टी अँड स्टॅडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) खाद्यान्न परवाना नूतनीकरणाची मुदत पुन्हा पाच वर्षांसाठी केली आहे. दरवर्षी खाद्यान्न परवाना नूतनीकरणाबाबतचा निर्णय ‘एफएसएसएआय’ने घेतला होता.
दरवर्षी परवाना नूतनीकरणास मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापारी संघटना दि पूना मर्चंट्स चेंबरने विरोध दर्शवून केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. चेंबरच्या पाठपुराव्यानंतर ‘एफएसएसएआय’ने पुन्हा परवाना नूतनीकरणाची मुदत पाच वर्ष केल्याने राज्यभरातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरवर्षी खाद्यान्न व्यवसाय परवाना नूतनीकरणाची अट व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी जाचक होती. या निर्णयाच्या विरुद्ध चेंबरने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.

खाद्यान्न परवाना नूतनीकरणाची मुदत पुन्हा पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सांगितले. दर वर्षाला खाद्यान्न व्यवसाय परवाना नूतनीकरण करण्याची अट व्यापारी आणि व्यावसायिकांना खूप जाचक होती. त्याविरुद्ध चेंबरने आवाज उठवला होता. आमची मागणी अखेर मान्य झाली आहे. आता खाद्यान्न परवाना एक ते पाच वर्षांसाठी मिळेल. राज्यातील इतर व्यापारी संघटनांनीही चेंबरच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता, असे बाठिया यांनी सांगितले.

www. konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button