
महामार्गावरून जाणार्या मच्छी वाहतूक गाड्यांमुळे दुर्गर्ंंधीचे साम्राज्य
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्या मच्छी वाहतूक करणार्या गाड्यांमधून बर्फाचे पाणी रस्त्यावर सोडण्यात येत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले असून पाणी रस्त्यावर सोडून देणार्या अशा गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
महामार्गावरून अनेक मोठ्या गाड्यांतून मच्छी वाहतूक होते. ही वाहतूक होत असताना अनेक वेळा रस्त्यावर पाणी सोडण्यात येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून याकडे वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
www.konkantoday.com