रत्नागिरी जिल्ह्यात काजू बोर्ड होण्यासाठी प्रयत्न व्हावेत

कोकण हा काजू उत्पादन क्षेत्रात अग्रेसर होत आहे, अनेक शेतकरी आज काजू उत्पादनाकडे वळले आहेत.भविष्यात काजू उत्पादनाचा हब कोकण होईल असे सांगताना रत्नागिरी जिल्ह्यात काजू बोर्ड होण्याबाबत जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांनी केंद्र व राज्य सरकारला प्रस्ताव पाठवावा अशी मागणी गाव विकास समितीचे डॉ. मंगेश कांगणे व श्यामकर्ण भोपळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात गाव विकास समितीचे डॉ. कांगणे व भोपळकर यांनी देवरुख येथील क्रांती व्यापारी संघटनेच्या मागणीला पाठिंबा दर्शवला असून याबाबत आता प्रशासकीय पातळीवर रत्नागिरी जिल्ह्यात काजू बोर्ड होण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button