रत्नागिरी गॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार, कामगारांना न्याय मिळवून देणार-उद्योगमंत्री उदय सामंत

गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू व कामावरून कमी केलेल्या कामगारांना न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पीडित कामगारांनी दिलेल्या भेटीप्रसंगी दिले.
आरजीपीपीएल म्हणजेच पूर्वीच्या एन्रॉन कंपनीमधील कामगारांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता अचानकपणे कामावरून कमी करण्यात आले होते. त्या कामगारांनी सामंत यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली. यावेळी सामंत यांनी जिल्हाधिकार्‍यांना सुचना केल्या. तसेच कंपनीच्या अधिकार्‍यांना तातडीने बोलवून घेतले. कंपनीच्या अधिकार्‍यांनी या कामासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत दिलेल्या रोस्टरप्रमाणे रूजू व्हावे व डिसेंबर अखेरीस पूर्ववत कामावर समाविष्ट करून घेण्यात येईल असे सांगितले.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button