
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एक मोठा प्रकल्प येण्यास इच्छुक
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एक मोठा प्रकल्प येण्यास इच्छुक आहे. एप्रिल एशिया कंपनी असे त्याचे नाव आहे. उच्च दर्जाचे टिश्यू बनवणारी ही सिंगापूरमधील कंपनी आहे. हे टिश्यू कंपनी निर्यात करते.त्यासाठी किनारपट्टी भागात सुमारे दोन हजार एकर जागा कंपनीला अपेक्षित असून, १० हजार कोटीची गुंतवणूक करण्यास तयार आहे. यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग येण्यास इच्छुक आहेत. त्यामध्ये कोकाकोला कंपनी, रेल्वेडबे बनवणारा कारखाना, पेपर मिल आदी कारखाने प्रस्तावित आहेत. या कारखान्यांमुळे जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्रामध्ये चांगली भर पडणार आहे. जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्याचा आयात-निर्यातीच्यादृष्टीने मोठा फायदा होणार आहे.
www.konkantoday.com