
प्रत्येक भेट ही राजकीय असतेच असे नाही-भाजपचे माजी खासदार नीलेश राणे
पालकमंत्री उदय सामंतांबरोबरची भेटीचा तुम्ही काहीही अर्थ काढू शकता; पण अशा गाठीभेटी होत असतात. ही भेट राजकीय नव्हती. प्रत्येक भेट ही राजकीय असतेच असे नाही. राजकारण सोडून काही गोष्टी असतात.
त्याला राजकारणाचा रंग दिला जातो, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुंबईतील भेटीवर व्यक्त केली.त्याला राजकारणाचा रंग दिला जातो, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुंबईतील भेटीवर व्यक्त केली.काही दिवसातच मुंबईत राणे यांनी मंत्री सामंत यांची भेट घेतली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून किरण सामंत हे इच्छुक आहेत. या परिस्थितीत राणे यांची भेट नक्की कोणत्या गोष्टीसाठी होती यावरून कार्यकर्त्यामध्ये तर्कवितर्क मांडले जात होते. या भेटीबाबत पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, सामंतांबरोबरची भेटीचा तुम्ही काहीही अर्थ काढू शकता; पण अशा गाठीभेटी होत असतात. ही भेट कुठली राजकीय नव्हती.
या भेटीबाबत तुम्ही चर्चा काय त्या रंगवा. तुम्हाला वाटत असेल ते आमचे वैरी आहेत म्हणून पण राजकारणात तसं नसतं. सध्या पक्षाची आता भूमिका वेगळी आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोतउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातीलही काही लोकांच्या वैयक्तीक भेटी होत असतात त्या राजकीय नसतात. भविष्यात लोकसभा की विधानसभा लढवणार, असे पत्रकारांनी विचारले असता राणे म्हणाले, निवडणूक लढविण्याविषयी पक्षश्रेष्ठी ठरवतात. त्यांचा आदेश येईल त्यानुसार कार्यवाही करणार. याविषयी मनात काय आहे, याला महत्व नसते.
www.konkantoday.com