
निसर्ग चक्रीवादळ नुकसान प्रकरणी नुकसानग्रस्तांना आर्थिक पॅकेज देण्याची आ. शेखर निकम यांची मागणी
नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा चिपळूण-संगमेश्वर तालुक्यासह कोकणला मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे अनेकांच्या घराची कौले, पत्रे उडून नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे चिपळूण-संगमेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून त्यांना विशेष आर्थिक पॅकेज मंजुर करावे अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते हाक्रवणे येथील नारायण तावडे यांचा पूर्वी वीज पडून मृत्यू झाला होता. त्याचे पंचनामे होवूनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. या मागणीचे पत्र त्यांनी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिले आहे.
www.konkantoday.com