
खेड एसटी प्रशासनाच्या विरोधात वैभव खेडेकरांनी अधिकार्यांना धरले धारेवर.
प्रवाशांच्या सेवेसाठी ही बिरूदावली मिरवणार्या एसटी प्रशासनाला सेवेचा विसर पडत चालला आहे. चालक-वाहकांच्या अंदाधुंदी कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. येथील बसस्थानकामधून रात्री ८ च्या सुमारास दापोलीला जाणार्या प्रवाशांना खोटे कारण सांगून तो थेट दापोलीला निघून गेला. ही बाब संतप्त प्रवाशांनी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर येथील बसस्थानक गाठत प्रशासनाला धारेवर धरले.
आक्रमकतेनंतर एसटी प्रशासनाने तातडीने प्रवाशांची दापोलीला जाण्यासाठी व्यवस्था केली.येथील बसस्थानक विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. मूलभूत सोयीसुविधांचा पुरता बोजवाराच उडाला असून अंदाधुंदी कारभारामुळे प्रवासी मेटाकुटीस आले आहेत. लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात मार्गस्थ होणार्या बसेस विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना घाम फुटत आहे. बस नेमकी केव्हा सुटेल, याबाबत विचारणा करणार्या प्रवाशांना थातुरमातूर उत्तरे देवून बोळवण करण्यापलिकडे काहीच केले जात नसल्याने प्रसंगी संतप्त प्रवाशांचा उद्रेकही होत आहे.www.konkantoday.com