
*बारावीत कमी मार्क पडले म्हणून नाराज आहात तर तुम्ही पुन्हा परीक्षा देऊ शकता, दहावीचा निकाल 27 तारखेला लागण्याची शक्यता
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान कमी गुण मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत. पण त्यांची नाराजी आता दूर करण्यात आली आहे.महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुलं पुन्हा बसू शकतात, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलाय. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या विद्यार्थ्यांना बारावीत कमी गुण मिळाले आहेत, त्या कोणीही नाराज होऊ नये. त्यांच्यासाठी परीक्षा लवकर घेण्याची सूचना केल्या आहेत. संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे ते म्हणाले. दहावीचा निकाल 27 जूनला लागू शकतो. 24 तारखेपासून प्रवेश सुरू होतील, असे ते म्हणाले. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार जी मुलं 12 वीत पास झाले परंतु ज्यांना कमी मार्क मिळाले आहेत. ती मूलही पुन्हा 12 वीच्या परीक्षेत बसू शकणार आहेत.www.konkantoday.com