वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या ७ तास ४५ मिनिटामध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार


कोकण रेल्वे मार्गावर एक नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रकाप्रमाणे गाड्यांचा वेग वाढणार असून नवे वेळापत्रक एक नोव्हेंबर ते ९ जूनपर्यंत लागू होणार आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात मिनी हायस्पिड असलेली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ही मुंबईहून मडगावला अवघ्या ७ तास ४५ मिनिटात पोहचणार आहे.पावसाळी हंगामामध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने गाड्यांचा वेग ताशी ५० ते ८० किलोमीटर असा असतो. मात्र, आता उन्हाळ्यामध्ये हा वेग कमालीचा वाढणार असून गाड्या १०० ते ११० किमी वेगाने धावणार आहेत. यामुळे या मार्गावर वेगवान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या ७ तास ४५ मिनिटामध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. तेजस एक्सप्रेस ९ तास १० मिनिटांमध्ये मडगावला पोहोचणार आहे.

जनशताब्दी एक्सप्रेस ही ९ तास २० मिनिटामध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. पावसाळी हंगामामध्ये गाड्यांचे वेळापत्रक सातत्याने विस्कळीत असते. मात्र, हे वेळापत्रक आता उन्हाळी हंगामात नियमित होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस मुंबई येथून रात्री ११. १७ वाजता सुटून मडगावला सकाळी ९.४५ वाजता पोहोचणार आहे.

परतीसाठी मडगाव येथून सायंकाळी ७.४० वाजता सुटून मुंबई सीएसटीला पहाटे ५.४० वाजता पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई येथून पहाटे ५.१८ वाजात सुटून मडगावला दुपारी २.३० मिनिटांनी पोचणार आहे. परतीसाठी दुपारी ३.०५ मिनिटांनी मडगाव येथील सुटून मुंबईला रात्री ११.३० वाजता पोचणार आहे. मिनी हाय स्पीड असलेली वंदे भारत एक्सप्रेस मुंबई येथून पहाटे ५.२५ वाजता सुटून मडगावला दुपारी १.१० मिनिटांनी पोहोचेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button