
कोकणात आता सलोखा योजनेचा चांगलाच प्रभाव, सलोखा योजनेत रत्नागिरी तालुका कोकण विभागात अव्वल
भाऊ-बंधकीच्या वादासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात आता सलोखा योजनेचा चांगलाच प्रभाव पडू लागला आहे. अनेक वर्ष वादात अडकलेल्या जमिनी आता सलोखा योजनेच्या निमित्ताने वादातून मुक्त होवू लागल्या आहेत. कोकण विभागात आता रत्नागिरी जिल्ह्याने अव्वल कामगिरी करत २२ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढली आहेत.
राज्य शासनाने ५० वर्षापूर्वी जमिनींचे लहान लहान तुकड्यांचे एकत्रीकरण केले होते. एकत्रीकरणामुळे मशागत करणे आणि देखभाल दुरूस्ती करणे सहज शक्य होईल, या हेतूने हे एकत्रीकरण करण्यात आले होते. मात्र राज्यात बहुतांशी जिल्ह्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने एकत्रीकरण झाल्याने जमिनीसंदर्भातील खटले वाढले आहेत.