लोकसभेच्या उमेदवारीसाठी किरण सामंत यांच्यासाठी ठाकरे गट आग्रह धरणार

रत्नागिरीतील उद्योगपती व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंताना लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून करण्यात येत आहे. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विधानामुळे हा विषय आता चर्चेत आला आहे. अन्य कोणी उमेदवार दिल्यास तो निवडून येण्याची शक्यता नाही. मात्र किरण सामंत यांना निवडून आणण्यासाठी सर्वांचे एकमत आहे, असा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
रत्नागिरी दौर्‍यावर आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी रविवारी लांजातील एका जाहीर सभेत हा धमाका उडवून दिला. सामंत यांनी सांगितले की, रत्नागिरीपासून सिंधुदुर्गापर्यंत किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मिळत आहे. सामंत वगळता अन्य कोणी उमेदवार दिल्यास तो निवडून येईल की नाही याबाबत काहीही सांगू शकत नाही असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. आपल्या पक्षातील लोकांचे एकवेळ ठीक आहे पण ठाकरे गटातील कार्यकर्तेही किरण सामंत यांना उमेदवारी दिल्यास पक्षभेद विसरून निवडून आणण्यासाठी काम करू अशी हमी देत आहेत, असा दावा मंत्री सामंत यांनी या जाहीर सभेत केला.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button