
आर एच पी फाऊंडेशनमुळे दिव्यांग क्वाड्राप्लेजिक शुभम चव्हाणला मिळाली यांत्रिक व्हील चेअर
रत्नागिरी:- शुभम रमाकांत चव्हाण.वय 26 वर्ष मु.पो.तुरभे पावस ता. जि.रत्नागीरी. शिक्षण १२ वी.वडील श्री.रमाकांत गोविंद चव्हाण मनोरुग्णालय रत्नागीरी येथेल कर्मचारी होते.तब्बेत ठीक नसल्याने वॉलंटरी रिटायरमेंट घेवुन घरीच असतात.आई रश्मी रमाकांत चव्हाण वुमन्स हॉस्पीटल रत्नागिरी येथे हाउसकिपींगचे काम करतात.शुभमला दोन बहीणी असुन एक विवाहीत आहे दुसरी जॉब करते.
शुभम उद्यमनगर रत्नागीरीमधे सलुनचा व्यवसाय करत होते.२०१८ साली दिवसभर काम करुन घरी परतत असताना बाईक अॅक्सीडेंट झाला मानेला मार लागल्याने क्वाड्राप्लेजिक (मानेपासून खाली शरीरात ताकद नसते)झाला.हाता पायातली पुर्ण ताकद गेल्याने चालता येणे बंद झाले.स्वत:च स्वत:ला काहीही करता येत नव्हते.व्हीलचेअर वापरावी लागते.पॅराप्लेजिक सेंटर सायन आणि हाजीअली येथे फिजिओथेरपी साठी काही वर्ष होते.हातामधे थोडी थोडी ताकद आली.सध्या मुंबईमधे शरण संस्थेत ट्रीटमेंट आणि फिजिओथेरपी साठी वर्षभर जात आहे.हातात बर्यापैकी ताकद आल्याने स्वत:चे स्वत: आवरता येते.बाहेर जावुन काम करणेसाठी ईतरांवर अवलंबुन रहावे लागते. सद्या boisha (बॉल थ्रो) पॅराऑलिम्पिकसाठी व रब्बी (पॅरा स्पोर्ट्स) साठी प्रयत्न चालू आहेत.
एका शिबिरात त्याची आर एच पी फाऊंडेशन रत्नागिरीचे अध्यक्ष श्री सादीक नाकाडे सर आणि सदस्य समीर नाकाडे यांच्याशी ओळख झाली.त्यावेळी त्याने मला बाहेर पडायचे आहे त्यासाठी इलेक्ट्रिक व्हीलचेअरची गरज आहे सांगितले.सद्या boisha (बॉल थ्रो) पॅराऑलिम्पिकसाठी व रब्बी (पॅरा स्पोर्ट्स) साठी प्रयत्न चालू आहेत असे सांगितले. त्याची गरज लक्षात घेऊन
आर एच पी फाऊंडेशन रत्नागिरीचे संस्थापक व अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी अलटीयस कंपनी ,नॅशियो संस्था ,चेंबूर यांच्या सहकार्याने शुभम चव्हाणला यांत्रिक व्हीलचेअर देण्यात आली.
या निओमोशन गाडीमुळे त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होणार आहे.तो पुर्णत: सेल्फ डिपेंडन् बनणार आहे.कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जावुन काम करु शकणार आहे.अर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहे.कौटुंबिक परिस्थिती सुधारणार आहे..शुभमने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरएचपी फाउंडेशन आणि ईतर सर्वांचेच मनापासुन आभार मानले आहेत.