राजापुरात महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र


राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे शिवसेना अशी महाविकास आघाडी आहे.
तरीही राजापुरात ठाकरे गटाचे खासदार व आमदार काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. कार्यक्रमात सहभागी करून घेत नाहीत. विकासकामांकडे दुर्लक्ष करत मनमानी करतात, असा आरोप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे राजापुरात महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्रित व एकसंघपणे काम करण्याचे धोरण ठरलेले असतानाही राजापुरात ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांकडून होत असलेल्या मनमानीचा व अन्यायाचा पाढा कॉंग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाचला.

अशीच भूमिका यापुढेही कायम राहणार असेल तर याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडले. राजापूर तालुका काँग्रेस कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी (ता. १३) काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार आणि आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button