कातळशिल्प, वारसा संशोधन केंद्राचे आज उदघाटन
कोकणातील कातळशिल्प व वारसा संशोधन केंद्राचे उदघाटन १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वा. शहरातील राणी लक्ष्मीबाई सभागृह शेरेनाका येथे होणार आहे. आय.टी.आय. टीम प्रवर्तक, आय. आय. टी. मद्रास व निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चर्चासत्रही होणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षात कोकणातील कातळशिल्प यावर चालू असलेल्या संशोधनामुळे अश्मयुगीन मानवाच्या राहणीमानाच्या पुराव्यांसोबत कोकणातील ज्ञात व अज्ञात पुरातत्व व ऐतिहासिक बाबींची नवनवीन पाने उलगडली जात आहेत. २०२२ मध्ये भारत सरकारतर्फे या कातळशिल्पांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला युनेस्कोने मान्यता दिली असून ९ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या प्राथमिक यादीत करण्यात आला आहे.
या विषयाचे एकंदरीत मानवी जीवनातील स्थान, भारत देशाच्या दृष्टीने त्याचे महत्व ओळखून विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारतर्फे कोकणातील कातळशिल्प संशोधन प्रकल्प या विषयाला राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. हा प्रकल्प विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्या पुढाकाराने आय. आय.टी. एम. प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, आय. आय. टी. मद्रास आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी द्वारा संचालित आय.आय.टी. हैद्राबाद, जे. एन. यु. दिल्ली यांच्या सहयोगाने केला जाणार आहे. या प्रकल्पात विविध विषयातील तज्ञ मंडळी, रत्नागिरीमधील गोगटे जोगळेकर महाविद्यालय, सीइएम.एस. मुंबई विद्यापीठ यांचाही समावेश आहे. www.konkantoday.com