
स्थानिकांना प्रकल्प नको तर आमचाही विरोध, माजी खासदार विनायक राऊत
सर्वसामान्यांना रिफायनरी प्रकल्प नको आहे. मग हा प्रकल्प कोणासाठी? मोदी शहा आडनाव असलेल्या भूमाफियांसाठीच ना, असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार विनायक राऊत यांनी स्थानिकांना जर प्रकल्प नको असेल तर आमची भूमिका ही स्थानिकांबरोबरच राहण्याची असेल. यामुळे आमचाही रिफायनरी प्रकल्पाला विरोध असणारच, असे पन्हळे येथील प्रचारसभेत जाहीर केले.विरोधकांकडून आम्ही १० वर्षात काय केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर या मतदार संघात आपण बीएसएनएलचे जाळे, राजापूर येथील पासपोर्ट कार्यालय, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात प्रगती व केंद्र शासनाच्या नवीन पर्यटन विकास धोरणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश केल्याने भविष्यात पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणार्या रस्त्याचे जाळे विणले जाणार आहे. असे सडेतोड उत्तर राऊत यांनी दिले आहे.तर राणेंवर टीका करताना नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद असतानाही त्यांनी कोकणचा विकास काय केला आहे, हे सर्वश्रृत आहे. भाजपची थापा मारण्याची सवय ही त्यांनाही जडली असून त्यांच्या थापांना भुलून जावू नका, स्वार्थासाठी म्हणजे स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांची ही शेवटची चाललेली धडपड आहे. राणेंचा यावेळी पराभव करून राणेंच्या पराभवाची हॅटट्रीक साधणार असे सांगताना खासदार राऊत यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. www.konkantoday.com