मालगुंड येथे ७ ऑक्टोबर रोजी रंगणार कवी केशवसुत जयंती महोत्सव !


(खंडाळा /रत्नागिरी)
को.म.सा.प. जिल्हाध्यक्ष आनंद शेलार यांच्या नेतृत्वाखाली मालगुंड, रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरूख व गुहागर या सहा शाखांच्या संयुक्त विद्यमाने अर्थात रत्नागिरी जिल्हा आयोजित कवी केशवसुत जयंती महोत्सव २०२३ दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी २:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होणार आहे.

या कार्यक्रमात यूट्यूबच्या माध्यमातून कवी केशवसुत यांच्या अजरामर कविता सादर करणारे सादरकर्ते राजेश गोसावी, तेजा मुळ्ये, आनंद शेलार, आकांक्षा भुर्के, दुर्गेश आखाडे माधव अंकलगे, अमेय धोपटकर, स्मिता बापट, शाहिद खेडकर, बाळासाहेब लबडे, समीर देशपांडे आणि अरुण मोर्ये हे असणार आहेत. तर या जयंती महोत्सवाचा मुख्य कार्यक्रमात मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन उर्फ आबा पाटील यांचे प्रास्ताविक, कवी केशवसुत यांच्या कवितेचे रसग्रहण करतील उज्ज्वला बापट, ‘समग्र केशवसुत’ या विषयी बोलताना आनंद शेलार हे कवी केशवसुतांचा जीवनपट उलगडतील. याचवेळी कवी केशवसुत यांच्या अजरामर कवितांचे सादरीकरण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सन्माननीय कवी करतील.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष कवी अरुण मोर्ये करीत असून सूत्रसंचालन केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगेसर करणार आहेत. ‌तर व्हिडिओ निर्माण प्रमुख राजेश गोसावी हे आहेत. तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजेंद्र चव्हाण, राजेश गोसावी, अमेय धोपटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परिसरातील साहित्यप्रेमींना हा कार्यक्रम पर्वणी ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त साहित्य प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी जिल्ह्यामार्फत करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button