
रत्नागिरीतील प्रसिद्धश्री रत्नागिरीचा राजा आणि रत्नागिरीचा राजाला कार्यकर्त्यांच्या उत्सवात व मोठ्या मिरवणुकीने भावपूर्ण निरोप
रत्नागिरीतील मानाचे आणि नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा आणि आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजा या दोन्ही गणपतींना शुक्रवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. दोन्ही राजांच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये रत्नागिरीकर मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले होते. अगदी वाजत-गाजत अशी मिरवणुक काढून दोन्ही राजांचे रात्री उशिराने विसर्जन करण्यात आले.
ढोल, ताशे, बेंजो, झांज पथक आदी वाद्यांच्या गजरात आणि फटक्यांच्या आतषबाजीत या मिरवणूका निघाल्या होत्या. आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजाच्या मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजाची विसर्जन मिरवणुक सायंकाळी चार वाजता सुरू झाली. या मिरवणुकीत सुरुवातीला पालकमंत्री उदय सामंत व
श्री रत्नागिरीचा राजा मंडळाचे अभिजित गोडबोले, यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. दोन्ही मिरवणुकांना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. या दोन्ही राजांच्या मिरवणुका पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती दोन्ही मिरवणुकांमधील मार्गांमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतुक पोलीसांनी तसेच कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. तसेच दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडव्यात म्हणून दोन्ही मंडळातील पदाधिकारी काळजी घेत होते. रात्री उशीरा दोन्ही राजांचे विसर्जन करण्यात आले.
www.konkantoday.com