सिंधुदुर्गात बुडणाऱ्या रत्नागिरीच्या मच्छीमारी नौकेवरील 15 खलाशांचे प्राण देवगड मधील मच्छिमारानी वाचविले


रत्नागिरीतील मच्छीमारी नौका देवगड समुद्रात मच्छीमारी करीत असताना
बोटीचे नटबोल्ट गंजल्याने पाणी पर्सनेट नौकेच्या आत शिरू लागल्याने रत्नागिरीतील पर्सनेट मच्छीमारी नौका कुणकेश्वरनजीकच्या समुद्रात बुडू लागली होती.
देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम व त्याचे सहकारी मदतीला धावून बोटीचे इंजिन सुरू करून बोटीसह १५ खलाशांचा जीव वाचविला आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास खोल समुद्रात घडली आहे.
अधिक माहिती अशी की, रत्नागिरीमधील गजानन माउली ही पर्सनेट नौका कुणकेश्वर समुद्रात मच्छीमारी करीत असतानाच बोटीच्या समोरील भागातील नटबोल्ट गंजल्याने त्या ठिकाणाहून पाणी बोटीत शिरू लागले. पाणी शिरल्याने बोटीचे इंजिन बंद पडल्याने बोट बुडू लागली. याचवेळी त्यांनी देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम यांना मोबाइलवरून संपर्क साधला असता त्यांनी आपल्या मालकीची बन्सी ही नौका घेऊन तातडीने बुडत असलेल्या गजानन माउली या बोटीकडे धाव घेतली. सुरुवातीला सर्व खलाशी आपल्या नौकेमध्ये घेतले. यानंतर अथक परिश्रमाने बंद पडलेले बोटीचे इंजिन सुरू करून पंपाने पाणी उपसा करीत ही बोट देवगड बंदरात सुखरुप आणली.
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे देवगडमधील मच्छिमारांना रत्नागिरीतील समुद्रात बुडत असलेल्या बोटीवरील खलाशांचे प्राण वाचविले. यामुळे देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button