गणेशोत्सवानंतर दापोली तालुक्यातील मच्छीमारी बोटी पुन्हा समुद्रात


गणपती उत्सवानिमित्त दापोली तालुक्यातील मासेमारी थांबली असून हर्णैतील ९९ टक्के बोटी आंजर्ले खाडीत नांगरून ठेवण्यात आल्या होत्या अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनानंतर या बोटी वातावरणातील बदलाचा अंदाज घेत पुन्हा समुद्रात सरसावणार असल्याने १० ते १२ दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा मासेमारीचा शुभारंभ होत आहे
गौरी-गणपतीचा सण आल्याने नौका खाडीत आणून उभ्या करण्यात आल्या होत्या दापोलीत छोट्या मोठ्या ६०० ते ७०० नौका आहेत. सध्या सर्व सुरक्षित ठिकाणी उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. १ ऑगस्ट रोजी साधला जाणारा मासेमारीचा मुहूर्त समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे हुकला होता. यानंतर उशिराने मच्छिमार हंगामाला सुरूवात झाल्यानंतर गणेशोत्सवानिमित्त मच्छिमारी बंद होती. यामुळे सप्टेंबर महिन्यानंतर पूर्ण ताकदीने मासेमारीला सुरूवात होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button