
बिबट्याने गोठ्यात घुसून केले वासराला ठार
रत्नागिरी तालुक्यातील विल्ये गावात गेली अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर असून अनेक बकर्या, कुत्रे ठार मारण्याचे प्रकार सुरू आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास विल्ये देसाईवाडी येथील शेतकरी चंद्रकांत काशिराम साळवी यांच्या मालकीच्या गाईचे दोन महिन्यांच्या वासराला बिबट्याने वाड्यात घुसून ठार केल्याची घटना घडली.
जीवापाड जनावरे सांभाळणार्या साळवी कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. सोमवारी सकाळी बिबट्याने साळवी यांच्या वाड्यात घुसून वासरावर हल्ला केल्याची बातमी गावचे सामाजिक कार्यकर्ते व प्रगत शेतकरी अमर देसाई यांना मिळताच त्यांनी तात्काळ साळवी यांच्या गोठ्याकडे धाव घेतली आणि मोठ्या आवाजाने बिबट्याला हटकून लावण्याचा धाडसी प्रयत्न करत असतानाच या हल्ल्यात ते वासरू गंभीर जखमी स्थितीत अमर देसाई यांनी या वासराला पाणी पाजून वाचवण्याचा प्रयत्न केला असता अखेर ते वासरू मृत्यूमुखी पडले.
www.konkantoday.com