
मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे चिपळूणला ग्रॅव्हीटी पाणी योजना मंजूर
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हेच खर्या अर्थाने जिल्ह्याचे पालक आहेत. त्यांच्यामुळे चिपळूणची ग्रॅवहीटी पाणी योजना मंजूर झाली असून त्यासाठी महायुतीतील सर्व नेत्यांचे प्रयत्न कामी आल्याची माहिती माजी नगरसेवक विजय चितळे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. लवकरच १६० कोटींच्या योजनेला आर्थिक मंजुरी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, २००३ सालीच मी ही योजना कागदावर आणली तेव्हा ती ३० ते ४० कोटीत होणार होती. मात्र त्यात काही अडचणी आल्या. त्यानंतर २०११ साली पुन्हा या योजनेचा विषय हातात घेण्यात आला. त्यावेळी आताचे व तेव्हाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पाठिंबा दिला. मात्र स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला. त्यानंतर अनेकदा योजनेचा विषय आला, मात्र तो पूर्णत्वाकडे जावू शकला नाही. यामुळे हा विषय आम्ही मंत्री चव्हाण यांच्याकडे नेला व त्यांनी या योजनेला मोठी गती देण्याचे काम केले. त्यामुळेच या योजनेला आता तांत्रिक मंजुरी मिळाली. यात महायुतीतील नेते, आमदार शेखर निकम यांसह अन्य सर्व नेत्यांचे प्रयत्नही कामी आल्याचे त्यांनी सांगितले.www.konkantoday.com