रत्नागिरी- महाड – वसई गाडीचा झाला हातखंबा जवळ झाला अपघात, स्वतः पालकमंत्री उदय सामंत धावले मदतीला,पालक मंत्र्यांनी बजावली पालकाची भूमिका


आज राज्याचे उद्योमंत्री ना.उदयजी सामंत हे रत्नागिरी तुन महाडच्या दौऱ्यावर जात असताना त्यांच्या गाडीच्या समोरच रत्नागिरी वसई गाडी रस्ता सोडून खाली गेल्याने मोठा अपघात झाला अपघात प्रवासी त्या बस मध्ये अडकले होते.आपघात पहिल्या नंतर रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत स्वतः गाडीतुन खाली उतरून त्यांनी स्वतःच्या कोणत्याही सुरक्षेचा विचार न करता मदत कार्याला सुरवात केली.तात्काळ त्यांनी आपल्या सहकाऱ्या घेवून एसटी बस मध्ये अडकलेल्या २१ लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम केले.ते एवढ्यावर थांबले नाही महाडचा दौरा असताना अपघातात जें जखमी झालेल्या प्रवासीना त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीतुन रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.त्यांनी केलेल्या या मदत कार्याबद्दल एसटी बस मधील त्या सर्व प्रवाशानी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांचे आभार मानले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button