
रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील गणेश पाटील आंब्याच्या पेटीला साडेआठ हजार रुपयाचा दर.
सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या हापूस आंब्याचा हंगाम थोडाफार सुरू झाला असून, रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील गणेश पाटील यांनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून पाच हापूस आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये (l रवाना केल्या. प्रत्येक पेटीला साडेआठ हजार रुपये दर मिळाला आहे. त्याबद्दल आंबा बागातदार यांनी समाधान व्यक्त केले.यावर्षी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे हापूस आंबा पिकाला चांगली गती प्राप्त झाल्याचे चित्र पावस परिसरामध्ये दिसत आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच गोळप, पावस, गणेशगुळे आदी गावांमधून टप्प्याटप्प्याने हापूस आंब्याच्या पेट्या रवाना होऊ लागल्या आहेत. सध्या हापूस आंब्याचे पीक कमी प्रमाणात असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात अनेकांनी तयार झालेल्या आंब्याच्या पेट्या पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाजारपेठेमध्ये सध्या चांगला दर मिळत आहे.