जयगडच्या जिंदाल कंपनीच्या जेटीचे काम तात्काळ बंद करण्याचे उद्योग मंत्र्यांनीच दिले कंपनीला आदेश


रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे असलेल्या जिंदाल कंपनी कडून नवीन जेटीचे काम सूरू असुन त्यांच्यामुळे स्थानिक मच्छिमारांमुळे नाहक त्रास दिला जात होते. त्याच्या विरोधात स्थानिकांनी एकत्र येत पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्याकडे तक्रार केली यावेळी मच्छिमारांनी पालकमंत्री यांच्या समोर जिंदाल कंपनीच्या समस्या बाबत पाढा वाचला
यावेळी मच्छिमारांचा संताप पाहायला मिळाला.त्यांचा संताप बघता पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी जिंदाल जेटीचे सूरू असलेले काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.यावेळेस जयगड मच्छिमारांना नाहक त्रास दिला तर गाठ माझ्याशी असल्याचा दम ही पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.मच्छिमारांच्या समस्या कंपनीने सोडवून मच्छिमारीला सुरवात करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले.यावेळी एम एम बीच्या अधिकऱ्याची चौकशी करण्याची मागणी केली.जिंदाल कंपनीची दादागिरी माझ्या माझ्या मतदार संघात चालवली जाणार नाही असे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी ठणकावून सांगितले.मच्छिमारांचा अडचणी तात्काळ कंपनीने सोडवा नंतर चर्चा करू असे आदेश पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी दिले.
. यावेळेस मीटिंगला जिल्हाधिकारी देवेदर सिंह,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,निवासी जिल्हाधिकारी श्री.सूर्यवंशी,प्रांत जीवन देसाई,एम एम बीचे अधिकारी उगल मुगळे,जिंदालचे अधिकारी,मच्छिमार मध्ये बशीर वडेकर,मुशतक टेमकर,सुदेश मोरे,बाबू पाटील,महेश नाटेकर,बहुसंख्येनं मच्छिमार उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button