
महावितरणाचा अजब कारभार सोमवारी सरकारी कार्यालयाच्या कामाच्या वेळेत काढतात दुरुस्तीची कामे , रत्नागिरी कराना कोणीही वाली नाही
रत्नागिरी शहरातील सरकारी कार्यालयाला शनिवार रविवार सुट्या असतात त्यामुळे सोमवारी सरकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते रत्नागिरी शहरातील सर्व कार्यालय कॉम्प्युटर झालेली आहेत त्यामुळे सोमवारी सरकारी कार्यालयातील कामासाठी खेडोपाड्यातून नागरिक येत असतात मात्र दर सोमवारी महावितरण तर्फे दुरुस्तीच्या कामासाठी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित केला जातो त्यामुळे सरकारी कार्यालयातील वीज गेल्यामुळे सर्वत्र बोंबाबोंब असते विज नसल्यामुळे कार्यालयाचे कामे ठप्प होत असल्याने नागरिकांना हेलपाटे पडत आहेत सोमवारी अनेक सरकारी कार्यालय काळोखात स्वतःपुरत्या इन्व्हर्टर वर चालत असल्याचे चित्र वारंवार दिसत आहे वास्तविक महावितरणाला सोमवार ऐवजी शनिवारी दुरुस्तीची कामे हाती घेता आली असती महावितरणाने सोमवारी शनिवारी दुरुस्तीची कामे घ्यावीत याबाबत वेळोवेळी आवाज उठविण्यात आला परंतु महावितरण आपला हेका चालवत सोमवारीच दुरुस्तीची कामे काढत आहेत त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधित खात्याला विश्वासात घेऊन तसे आदेश देणे आवश्यक आहे मात्र सहनशील असलेल्या रत्नागिरी-करांकडे दरवेळेप्रमाणे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे तुम्हाला तुमची कामे करून घ्यायची असेल तर हेलपाटे मारा अशी अवस्था सामान्य जनतेची झाली आहे एरवी नागरिकांची एका दुसरे बिल थकले असेल तर वारंवार महावितरणाकडून मेसेज येतात जर विद्युत पुरवठा खंडित करायचा असेल तर महावितरणाने सर्व नागरिकांना मोबाईलद्वारे मेसेज पाठवून त्याची माहिती देणे आवश्यक आहे आज सोमवारी नाचणे विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता त्याचा कोणताही मेसेज वीज ग्राहकांना पाठवण्यात आला नव्हता महावितरणाच्या खालच्या कार्यालयाकडे चौकशी केली असता नाचणे भागाकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून तो संध्याकाळपर्यंत सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले मात्र महावितरणाचा नाचणे कार्यालयाचा फोन अनेक दिवस बंद आहे यावर फोन केला असता फोन बंद असल्याचे सांगण्यात येते त्यामुळे तेथील संबंधितांना नागरिकांना उत्तरे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे कोणी कसे वागा रत्नागिरी करांनी ते सहन करायचे अशी अति सहनशीलतेची भूमिका रत्नागिरी करांची बनत चालली आहे
रत्नागिरी कर नागरिकांना कोणी पालक आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे
www.konkantoday.com