मी बारा गावचं पाणी पिलो आहे आणि इतरांनाही पाजतो आहे-उपमुख्यमंत्री अजित पवार

दिल्लीत बायकोची पर्स फिरवत बसायला मी एवढा लेचापेचा नेता आहे का? मी बारा गावचं पाणी पिलो आहे आणि इतरांनाही पाजतो आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे समोरच्यांनी टिका करताना काहीतरी विचार करावा.मी इतरांवर टिका करण्यापेक्षा विकास कामांना अधिक महत्व देतो. विकासाच्या मुद्दावर आणि बारामतीकरांच्या पाटींबाने माझी पत्नी सुनेत्रा पवार निवडून येणारच आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचे नाव न घेता त्यांच्या टिकेचा समाचार घेतला.लोकसभा निवडणूकीत खडकवासला घड्याळाला एक लाखांचे लिड देणार आहे, बारामतीकारांसह इतर तालुक्यातही भावनिक न होता विकास डोळ्यासमोर ठेवून घड्याळ चालवावे, असेही आवाहन उपस्थितांना करण्यास अजित पवार यावेळी विसरले नाहीत.देशाचे भवितव्य घडविणारी लोकसभा निवडणूक आहे. देशाची प्रगती आणि १४० कोटी जनतेची सुरक्षितता आदी विकसनशिल गोष्टींना मतदारांनी प्रधान्य द्यावे, असे आवाहन करीत अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी पक्षाची ८० टक्के आमदार, खासदार आणि कार्यकर्ते भाजप विचाराबरोबर गेले आहेत. नेमकी हीच बाब निवडणूक आयोगाने मान्य केली आणि राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्हाला दिले. त्यामुळे पवारसाहेबांनी पक्ष चोरून नेला असे म्हणणे चूकीचे आहे. वास्तविक पवारसाहेबांनीच २०२४ चा पंतप्रधान मोदीसाहेब पुन्हा होणार, असे सांगितले होते. त्यानुसार शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार कायम ठेवून भाजपबरोबर जाण्याचे ठरले होते. परंतु साहेबांनी ऐनवेळी भूमिका बदली. त्या गोष्टीचा त्यांच्यासह सर्वांनाच त्रास होत आहे.”www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button