
रिफायनरी विरोधातील गावे प्रकल्पातून वगळा ,रिफायनरी समर्थकांचा नवा पवित्रा
रिफायनरीला विरोध असलेल्या व विस्थापनाच्या कारणामुळे ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणार्या नाणार, दत्तवाडी, पाळेकरवाडी या तीन गावांना प्रकल्पाच्या मधून वगळण्यात यावे असा प्रस्ताव आपण कंपनीला दिला असल्याची माहिती कोकण जनकल्याण समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी पत्रकारांना दिली.रिफायनरीसाठी एकूण साडेतेरा हजार एकर जागेची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते.ही तीन गावे वगळल्यास २७०० एकर जागा कमी होणार आहे.मात्र त्याऐवजी नजीकची अनेक गावे प्रकल्पात येण्यास पुढे आहेत. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानकडे सध्या आठ हजार एकरपेक्षा अधिक जागा मालकांची संमती आहे.यामुळे विरोध असणाऱ्या गावांना वगळून अन्य लोकांना ज्यांना रिफायनरी पाहिजे आहे ते स्थानिक शेतकरी प्रकल्पासाठी जागा देण्यास तयार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कंपनी प्रकल्प उभारू शकते.दहा हजार एकर जागेत कंपनी प्रकल्प उभारण्यास तयार आहे.जागा देऊ इच्छिणारे सर्व जमीन मालक स्थानिक आहेत.त्यात कोणीही परप्रांती नाही यामुळे विरोध असलेले तीन गावे वगळून आणि विकासाच्या मुद्द्यावर प्रकल्प होण्यासाठी उत्सुक असलेल्या नजीकच्या गावांचा समावेश करून हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभा करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहितीही आंबेरकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर रिफायनरीबाबत त्यांच्या वक्तव्यामुळे दत्तवाडी भागात प्रकल्प विरोधकांची सभा होऊन त्यात मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला होता.
विरोध असणारी गावे वगळून ज्या गावांना हा प्रकल्प हवा आहे त्या गावात प्रकल्प उभा करावा ही जनकल्याण समितीने केलेली मागणी म्हणजे त्यांनी टाकलेली गुगली असून यामुळे विरोधकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
www.konkantoday.com