जनतेला आनंदाचा शिधा पण रेशन दुकानदारांचे पाच महिन्याचे कमिशन नाही
शासन रेशन
दुकानदारांकडून पारदर्शकतेची अपेक्षा करत आहे. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून रेशन दुकानदार कमिशनपासून वंचित आहेत. या कमिशनचा प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लावावा, अन्यथा जिल्हा संघटना काम बंद आंदोलन करेल, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिला आहे.
याबाबत कदम म्हणाले की जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना मिळणारी कमिशनची रक्कम गेल्या पाच महिन्यापासून मिळाली नाही. त्यामुळे दुकानदारांना कुटुंब आणि व्यवसाय सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच दुकानदारांना आनंदाचा
शिधा रोखीत उचलावा लागत आहे. त्यासाठी पैसे कसे उभे करायचे, असा प्रश्न रेशन दुकानदारांना पडला आहे.
www.konkantoday.com