
शीळ येथील डोंगर परिसरात वणवा
राजापूर : शहरानजीकच्या शीळ येथील डोंगर परिसर (सडा) वणवा लागून गेल्या दोन दिवसांपासून लागलेल्या वणव्यात गुरांच्या वैरणीच्या गवतासह डोंगर भागामध्ये शेतकर्यांनी विकसित केलेल्या आंबा, काजूच्या बागांचे नुकसान झाले आहे. गवत जळून खाक झाल्याने गुरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये दिवाळीनंतर नोव्हेबर-डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्यानंतर पुढे काही महिने या भागामध्ये सातत्याने वणवा लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये शेतकर्यांनी विकसित केलेल्या बागा, गवत जळून खाक होताना लाखो रूपयांचा नुकसान होते. वणवा लागतो की जाणूनबुजून लावला जातो याचा शोध घेण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे. वणव्याची झळ शीळ गावासह लगतच्या गोठणेदोनिवडे भागालाही बसली आहे.सड्यावर गुरांना चारण्यासाठी असलेले गवतही जळून खाक झाले आहे. वणव्यामध्ये डोंगर होरपळत असताना 13 रोजी रात्री उशिरापर्यंत शीळ येथील मोठ्यासंख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी वणवा आटोक्यात आणला.
www.konkantoday.com