ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवास सवलत पूर्ववत सुरू करावी, श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाची पंतप्रधानांकडे मागणी
भारतीय रेल्वे कडून ज्येष्ठ नागरिकांना गेली अनेक वर्षे सुरू असलेली रेल्वे प्रवास भाड्यातील सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली. मात्र ही सवलत पुन्हा सुरू करण्यात येत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ही सवलत तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा चे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि सचिव सुरेंद्र घुडे यांनी पंतप्रधानाकडे एका पत्राद्वारे केली आहे.
या पत्राच्या प्रती राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत तसेच खासदार विनायक राऊत त्यांना देण्यात आल्या असून त्यांनी सर्व खासदारांसोबत या मागणीचा केंद्राकडे आग्रह पूर्वक पाठपुरावा करावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे
www.konkantoday.com