संजय राऊतांना चंद्रयानातून चंद्रावर पाठविले असते तर महाराष्ट्रातील राजकारण शांत होऊन दररोजची किरकिर बंद झाली असती-आमदार शहाजी पाटील


देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वात मोठी चूक केली आहे. त्यांनी चांद्रयानातून खासदार संजय राऊत यांना चंद्रावर सोडायला हवे होते. खासदार राऊतांना चंद्रावर पाठविले असते तर महाराष्ट्रातील राजकारण शांत झाले असते.दररोजची किरकिर बंद झाल्या असती असा उपरोधिक टोला आमदार शहाजी पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.

सांगोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आले होते. भूमिपूजन सोहळ्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी पत्रकाराशी संवाद साधताना संजय राऊत यांच्याविषयी बोलत होते.

राज्यात गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांच्यातील वाकयुद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button