रत्नागिरी तालुक्यातील साठरेबांबर येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील साठरेबांबर येथील महिलेच्या पायाला सुज येवून दुखू लागल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांच्या माहितीनुसार स्नेहल संतोष लिंगायत (४८, रा. खोचाडेवाडी साठरेबांबर , रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी ४ जून रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास जिल्हा रूग्णालयात घडली. लिंगायत यांना एक आठवड्यापासून पायाला सुज येवून दुखत होता. पाली येथे व रत्नागिरीत खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मंगळवारी पायाची सुज आणि पाय दुखू लागल्याने प्रथम पाली येथील ग्रामीण रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button