आजपासून म्हणजेच, 25 एप्रिल 2023 पासून परशुराम घाटातील वाहतूक दोन आठवडे ठराविक वेळेत बंद राहणार

मुंबई-गोवा महामार्गावरून  प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे आजपासून म्हणजेच, 25 एप्रिल 2023 पासून परशुराम घाटातील  वाहतूक दोन आठवडे ठराविक वेळेत बंद राहणार आहे. घाटातील रुंदीकरण आणि उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी वाहतूक काही ठराविक वेळेत बंद राहणार आहे. 25 एप्रिलपासून 10 मेपर्यंत दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घाटातील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, हलक्या वाहानांची पर्यायी वाहतूक कळंबस्ते-चिरणी मार्गे वळवण्यात आली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम महत्त्वाच्या टप्प्यावर आलं असल्यानं पावसाळ्यापूर्वी धोकायदायक स्थितीत असलेलं शिल्लक काम मार्गी लावण्यासाठी 25 एप्रिल ते 10 मे अशा 16 दिवसांसाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5:00 या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. बंद कालावधी हलक्या वाहनांची पर्यायी वाहतूक कळंबस्ते-आंबडस-चीरणी मार्गे वळवण्यात येणार आहे. दरम्यान, या कालावधीत येथून सुटणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या सुमारे शंभरहून अधिक बसेसना पर्यायी मार्गानं न सोडल्यास खोळंबा होणार आहे.
परशुराम घाटातील वाहतूक दोन आठवडे ठराविक वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button