भर उन्हाळ्यात रस्त्यावर पाणीच पाणी करण्याची रत्नागिरी नगरपरिषदेची किमया


उन्हाळ्यामुळे अनेक भागात पाणीटंचाई जाणवत असेल मात्र रत्नागिरी शहरात भर उन्हाळ्यात देखील रस्त्यावर पाणीच पाणी करण्याची किमया रत्नागिरी नगर परिषद नव्या नळ पाणी योजनेच्या निमित्ताने करीत आहे गेल्या काही महिन्यात नवीन नळ पाणी योजनेचे पाईप फुटण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत आता त्यावर उपाय म्हणून रत्नागिरी नगर परिषद पन्नास ठिकाणी व्हॉल्व बसवणार आहे असे नुकतेच नगर परिषदेने जाहीर केले आहे मात्र रोज नव्या नव्या ठिकाणी ही नवीन पाईपलाईन फुटत आहे त्यामुळे नगरपरिषद कुठे कुठे हे व्हॉल्व बसवणार हा प्रश्नच आहे आज रत्नागिरी नगर परिषदेच्या समोरच आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या ओंकार बॅटरी समोर रत्नागिरी नगर परिषदेच्या नव्या योजनेचा पाईप फुटून सर्व भागात पाणीच पाणी झाले हे पाणी अगदी जयस्तंभापर्यंत वाहत होते रत्नागिरी नगरपरिषद नव्या पाईपलाईन नंतर शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करणार हे माहीत होते पण तो अशा पद्धतीने होईल याची कल्पना बिचाऱ्या नागरिकांना नव्हती

उन्हाळ्यामुळे अनेक भागात पाणीटंचाई जाणवत असेल मात्र रत्नागिरी शहरात भर उन्हाळ्यात देखील रस्त्यावर पाणीच पाणी करण्याची किमया रत्नागिरी नगर परिषद नव्या नळ पाणी योजनेच्या निमित्ताने करीत आहे गेल्या काही महिन्यात नवीन नळ पाणी योजनेचे पाईप फुटण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत आता त्यावर उपाय म्हणून रत्नागिरी नगर परिषद पन्नास ठिकाणी व्हॉल्व बसवणार आहे असे नुकतेच नगर परिषदेने जाहीर केले आहे मात्र रोज नव्या नव्या ठिकाणी ही नवीन पाईपलाईन फुटत आहे त्यामुळे नगरपरिषद कुठे कुठे हे व्हॉल्व बसवणार हा प्रश्नच आहे आज रत्नागिरी नगर परिषदेच्या समोरच आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या ओंकार बॅटरी समोर रत्नागिरी नगर परिषदेच्या नव्या योजनेचा पाईप फुटून सर्व भागात पाणीच पाणी झाले हे पाणी अगदी जयस्तंभापर्यंत वाहत होते रत्नागिरी नगरपरिषद नव्या पाईपलाईन नंतर शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करणार हे माहीत होते पण तो अशा पद्धतीने होईल याची कल्पना बिचाऱ्या नागरिकांना नव्हती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button