मा.लक्ष्मीनारायण मिश्रा – एक देवदूत

होय….,
सर, श्रीक्षेत्र गणपतीपुळे च्या पावन भूमीत आम्ही तुमच्या सारखा देव अनुभवलाय !
कारण एवढे अलौकिक काम करुनही प्रसिध्दी माथ्यमापासुन कोसो दुर राहीलात आणि नवरत्नाची खाण म्हणुन नावारुपाला आलेला आपला रत्नागिरी जिल्हा ज्याप्रकारे आज एका मोठ्या संकटातून बाहेर काढताय त्याच सर्व श्रेय निश्चितच आपल्या सारख्या कर्तृत्ववान अधिकार्‍यालाच जात!

रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात मा.श्री.लक्ष्मीनारायण मिश्रा सर यांच्या रुपाने जिल्ह्याला एक कार्यक्षम,संयमी,दूरदृष्टी असलेले जिल्हाधिकारी लाभले.
मुंबई,पुणे,सांगली,अशा कोरोना हाॅटस्पाॅट जिल्ह्यापासुन अगदी हाकेच्या अंतरावर असलेला आणि प्रचंड सागरी किनारा असलेला आपला रत्नागिरी जिल्हा जगात हाहाकार माजवत असलेल्या कोरोना आजाराचा कसा मुकाबला करणार,हे पहाणे खरच औत्सुक्याच होत आणि मार्च महिन्याच्या उत्तरार्धातच कोरोनान आपल्या जिल्ह्यात अगदी थाटात प्रवेश केला.
तत्क्षणी परिस्थितीचे गांभीर्य आणि परिणाम ओळखून मा.लक्ष्मीनारायण मिश्रा सर जिल्हाधिकारी रत्नागिरी महोदयांनी क्षणाचाही विलंब न करता जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने कोरोना आणि जिल्ह्यातील इतर सर्व समस्या नियोजन पुर्वक पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे हाताळल्या.

मा.जिल्हाधिकारी महोदयांनी ग्रामस्तरीय सर्वच कर्मचारी यांचे मार्फत करुन घेतलेले जिल्ह्यातील संपूर्ण गाव / वाडी येथील प्रत्येक कुटुंबाचा केलेले सर्वेक्षण असेल किंवा अडकलेल्या परप्रांतीय मजुर यांचे सर्वेक्षण असेल तसेच परदेश भ्रमण करुन आलेल्या लोकांचे सर्वेक्षण फक्त बारा तासातच पुर्ण करुन एका विक्रमासह परिस्थितीचे गांभीर्यही प्रत्येकाच्या मनावर बिंबवलात.
फक्त सर्वेक्षण करुन न थांबता अन्न, वस्त्र आणि निवारा तसेच ऐनवेळी उद्भभवलेस आजार आणि उपचार याबाबत आपण प्रत्येक ग्राम स्तरावर नियोजन करुन एक विश्वासाचे वातावरण संपूर्ण जिल्ह्यात निर्माण केलात, ज्यामुळे जिल्ह्यात कुठेही कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.


इतकेच नाही तर या आपल्या सुक्ष्म नियोजना मुळेच जनतेने social distance सारखे शासनाचे आदेश पाळुन येणाऱ्या मोठ्या संकटाला दुर ठेवण्याचा प्रयत्न केला.
याचबरोबर,
आंतर जिल्हाबंदी बाबत फक्त हायवेच नाही तर सागरी मार्गासह रेल्वे पटरी सारख्या चोरट्या मार्गाचीही नाकाबंदी केलेनेच अनेक बाबतीत उपाययोजना करणे शक्य आणि सुकर झाले.
आणि यामुळेच जिल्ह्यात आलेल कोरोनाच संकट आटोक्यातच नाही तर शून्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी मा.लक्ष्मीनारायण मिश्रा सर यांनी केलेले काम फक्त कौतुकास्पदच नाही तर अविस्मरणीय आहे.
आणि अशावेळी मग
आपोआपच तोंडातून शब्द बाहेर पडतात………….
मा.श्री.लक्ष्मीनारायण मिश्रा सर – एक देवदूत

👏🏻👏🏻👏🏻
श्री.उमाकांत देशमुख
सरचिटणीस,
रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ
👏🏻👏🏻👏🏻

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button