रत्नागिरी जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून केवायसी करण्याची धडक मोहीम.

रत्नागिरी जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून आता ई केवायसी करण्याची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात लावण्यात आलेले कॅम्प तसेच सर्व रास्त धान्य दुकानांवर ई केवायसी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे डिसेंबर २०२४ पर्यंत २६ टक्क्यांवर असलेले ई केवायसीचे काम आता फेब्रुवारी महिन्यात ६७.६७ इतके झाले आहे.

सर्वच नागरिकांनी आपल्या शिधापत्रिकांसाठी ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप केदारे यांनी केले आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ४ लाख ४४ हजार ६४८ शिधापत्रिकाधारक आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button