दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्प मार्गी लावण्याची मनसेची मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या घनकचरा प्रकल्पाचा मुद्दा रत्नागिरी तालुका मनसेने हाती घेतला आहे. तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेऊन हा दांडेआडोम येथील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली. रत्नागिरी शहरात दररोज 20 ते 22 टन कचरा जमा होतो. हा कचरा साळवीस्टॉप येथील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. याठिकाणी कचर्याला आग लागते. त्यामुळे हवा प्रदूषण होत असल्याकडे मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकार्यांचे लक्ष वेधले. यासंदर्भात निवेदनही देण्यात आले आहे. यावेळी अॅड. प्रफुल्ल सावंत, राजू पाचकुडे, जयेश दुधरे, सोहम पिलणकर, शैलेश मुकादम, रुपेश चव्हाण, नैनेश कामेरकर, यश पोमेंडकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.