पिसाळलेल्या कुत्र्याने वेरळ गावात धुमाकूळ घातला,कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी


लांजाः- पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत . यातील दोघांचे या कुत्र्याने चांगलेच लचके तोडले आहेत
लांजा तालुक्यातील वेरळ गावी शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमी झालेल्या तिघांना तातडीने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे . पिसाळलेल्या कुत्र्याने वेरळ गावात धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्याने शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी तिघाजणांवर हल्ला केला . या हल्ल्यात जयवंती पानकर यांना खाली पाडून त्यांच्या खांद्याचा जोरदार चावा कुत्र्याने घेतला .
त्याचप्रमाणे शिवाजी पातेरे यांचादेखील त्याने चावा घेतला . तर कार्तिक मंगेश डाकवे या मुलावर हल्ला करून त्याच्या मानेजवळ चावा घेतला आहे. तिघांवर हल्ला करून या कुत्र्याने जखमी केल्याने वेरळ गावात कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या कुत्र्याने गुरूवारी वेरळ जवळच्या आंजणारी गावातील चारजणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केले होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button