चिपळुणात गाळ उपशासाठी पुन्हा एल्गार

२६ जानेवारीपासून गतवर्षी स्थगित केलेले धरणे आंदोलन पुन्हा सुरू करणार
प्रलयकारी महापुरानंतर गतवर्षी वाशिष्ठी, शिवनदीतील गाळउपसा करण्यात आला. जलसंपदाने राज्यभरातील यंत्रसामुग्री वाशिष्ठी नदीत उतरवत उपसा केला. मात्र यावर्षी यातील १० टक्केही यंत्रसामुग्री नसल्याने उपसा संथगतीने सुरू आहे. त्यामुळे गतवर्षीसारखी संपूर्ण यंत्रसामुग्री लावून गाळ न काढल्यास येत्या २६ जानेवारीपासून गतवर्षी स्थगित केलेले धरणे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा बचाव समितीने बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात बुधवारी बचाव समितीचे बापू काणे, राजेश वाजे, शिरीष काटकर, किशोर रेडीज, मिलिंद कापडी, यांच्यावतीने स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की २२ व २३ जुलै २०२१ च्या महाप्रलयंकारी पुरामुळे चिपळूण शहर व परिसरातील गावांचे मोठे नुकसान झाले.                                    www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button