
शेतकर्यांना भात खरेदीच्या शासकीय दरामध्ये यावर्षी झालेल्या वाढीने हात दिला*
*___कोकणात अनिश्चित पावसावर अवलंबून केल्या जाणार्या खरिपाच्या लागवडीत याही वर्षी पावसाने जेमतेम सरासरी गाठली. लावणीच्या वेळी पावसाने मारलेली दांडी आणि कापणीच्या वेळी पडलेला अवकाळी पाऊस आदींमुळे भात शेतीच्या झालेल्या नुकसानीने या वर्षीही शेतकर्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला होता; मात्र त्यातून सावरलेल्या शेतकर्यांना भात खरेदीच्या शासकीय दरामध्ये यावर्षी झालेल्या वाढीने हात दिला आहे.या वर्षी जिल्हा खरेदी-विक्री संघाकडे आजपर्यंत साडेआठ हजार क्विंटल भात विक्री केली. भात खरेदी विक्रीच्या माध्यमातून या वर्षी 2 कोटी 97 लाख 57 हजार रुपयांची उलाढाल झाली.लावणीवेळी पावसाने मारलेली दांडी आणि कापणीवेळी पडलेला अवकाळी पाऊस, किडींचा प्रादुर्भाव आदींमुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानाने या वर्षीही शेतकरी अडचणीत आला होता. मात्र, खरेदी-विक्री संघाने या वर्षी भाताला हमी भाव देताना शेतकर्यांना बोनसही दिला. मात्र, पीक नोंदणी करण्याची अट शेतकर्यांना घातली होती. त्यानुसार चांगला दर दिल्याने या वर्षी अडचणीत सापडलेल्या भात उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.www.konkantoday.com