
भात खरेदी करताना ठेवलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी
रत्नागिरी : भात खरेदी करताना ज्या जाचक अटी ठेवलेल्या आहेत, त्या शिथिल कराव्यात. तसेच शेतकर्यांना मिळणारा बोनस पुन्हा सुरु करावा, अशी मागणी जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकर्यांनी केले आहे.
भात विक्री केल्यानंतर शेतकर्यांना पावती व कागदपत्रेही खरेदी-विक्री केंद्रातच उपलब्ध करून देण्याची मागणीही शेतकर्यांनी मांडली आहे. भात खेरदी करताना गेली अनेक वर्षे बोनस देण्यात येत होता. मात्र कोव्हिडच्या काळात यात खंड पडला होता. धान्य खरेदी योजनेंतर्गत राज्याने भात खरेदीसाठी प्रति क्विंटल 2040 रुपये दर निश्चित केला आहे. ज्या शेतकर्यांनी ऑनलाईन भात नोंदणी केली आहे, त्यांनी भात नोंदणी केलेला सातबारा घेऊन भात विक्रीसाठी आणावे, असे आवाहन मार्केटिंग फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.