
शेतकर्यांच्या अडचणी दूर करून रिफायनरी : ना. उदय सामंत
रत्नागिरी : शेतकर्यांच्या अडचणी दूर करून रिफायनरीचा प्रकल्पासाठी सकारात्मक आहोत. यातून रोजगार निर्मिती होईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी येथील महाजन क्रीडा संकुलातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे असतील. जे जे टीका करतायत ते कुणाची सुपारी घेऊन टीका करताहेत हे माहीत आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून आपण साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. भैरीच्या देवळात पाय ठेवणारे पहिले मुख्यमंत्री आपण आहात. आपल्याला परमेश्वराचाच नाही तर निसर्गाचाही आशीर्वाद आहे, असे ना. सामंत म्हणाले.