
सरत्या वर्षाला रत्नागिरीकरांसह हजारो पर्यटकांनी दिला निरोप
रत्नागिरी : सरत्या वर्षाला कोकणातील नागरिकांनी व कोकणात आलेल्या पर्यटकांनी निरोप दिला. यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यदर्शन करण्यासाठी किनारे पर्यटकांनी गजबजून गेले. नववर्षाचे स्वागतही जल्लोषानेच झाले. कोकणातील हॉटेल्स, रिसॉर्टस, फार्म हाऊसेस दोन दिवस हाऊसफुल्ल राहणार आहेत. हजारोंच्या संख्येेने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गणपतीपुळ्यासह जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. मासळी, चिकन, मटण यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.




