जनतेचे म्हणणे विचारात घेऊन रिफायनरीचा निर्णय घेणार : मुख्यमंत्री शिंदे
खेड : कोकणातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून त्या दृष्टीने निर्णय घेण्यात येतील. रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार जनतेसोबत असून येथील जनतेची खरी मते जाणून घेऊनच निर्णय घेणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दि.15 रोजी खेड येथे सांगितले. खासगी दौर्यावर आले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोकणातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, या दृष्टीने राज्य सरकार पावले उचलत आहेत. या वेळी त्यांच्यासोबत खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम, गटनेते आमदार भरत गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.