कार्तिकीच्या जत्रेत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्तच्या जत्रेत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन तरुणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवार 5 नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. कैलास राहूल खाडे (23) व अमोल विजय दगडे (19, ऱा. दोन्ही पिंपरी पुणे) अशी दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होऊ शकतात याचा विचार करून पोलिस जत्रेत लक्ष ठेवून होते. मात्र शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जत्रेत संशयास्पदरित्या फिरताना दोघेजण आढळून आले. या दोघांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. शहर पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावल्याने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button