
मोठा निर्णय! लाईट बिल वेळेत भरा नाहीतर महावितरण झोप उडवणार; ३०० कर्मचारी तैनात!!
मुंबई : थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने कंबर कसली आहे. त्यानुसार थकबाकीच्या वसुलीसाठी संबंधिताला वेळोवेळी फोन कॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विभागनिहाय १६ कॉल सेंटर सुरू केली जणार असून त्यामध्ये ३०० कर्मचाऱ्यांना तैनात करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यामुळे वीजबिल थकबाकीदारांना महावितरणकडून फोन कॉल येणार असल्याचे निश्चित झाले आहे.*महावितरणचे राज्यभरात पावणे तीन कोटी वीजग्राहक असून सुमारे ७० हजार कोटी रुपयांहून अधिक वीजबिलाची रक्कम थकीत असून त्यामध्ये भर पडत आहे. त्यामुळे या थकीत वीजबिलाची प्रभावीपणे वसुली करता यावी, संबंधित थकबाकीदाराला वेळोवेळी वीजबिल भरण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी काॅल सेंटरमधून काॅल केले जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र काॅल सेंटर आणि ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.त्याबाबतचे निर्देश मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. तसेच काॅल सेंटरच्या कामकाजाचा आणि वसूल झालेल्या बिलाचा वेळोवेळी आढाव घेतला जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.*कोणाला कधी जाणार कॉल*- एखादा वीजग्राहक नियमितपणे वेळेत बिल भरत असेल, पण कधी विलंब झाल्यास त्याला बिल भरण्याबाबत आठवण म्हणून काॅल केला जाईल.- जे ग्राहक वीजबिल भण्याची मुदत संपल्यानंतर नवीन बिल तयार होण्याआधी बिल भरत असेल; तर त्यांना मुदत संपण्याआधी फोन करून बिल भरण्याची विनंती केली जाईल.- एखाद्या ग्राहकाने बिल भरण्याची तारीख संपल्यानंतर १५ दिवसांनी बिल भरले नसेल, तर त्याला काॅल करून बिल भरण्यास सांगितले जाईल, तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई केली जाऊ शकते, याचीही माहिती दिली जाईल.*या जिल्ह्यांमध्ये काॅल सेंटर*महावितरणकडून छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, भांडूप, जळगाव, कल्याण, रत्नागिरी, नाशिक, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, बारामती, कोल्हापूर, पुणे या विभागीय कार्यालयांमध्ये काॅल सेंटर तयार केली जाणार आहेत.