‘पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत विमा कंपन्यांना कळवा’

रत्नागिरी : कोकण विभागात होणारा सततचा अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे या विभागातील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकर्‍यांनी त्यांच्या सर्वे नंबरनुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत नुकसानाची माहिती घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक असल्याचे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.  
कोकण विभागातील रायगड व पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना ही भारतीय कृषी विमा कंपनी तर ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स क.लि. या विमा कंपन्याकडून राबविण्यात येत आहे. कोकण विभागात सध्या भात, नाचणी व उडीद पिकांच्या कापणीला सुरुवात झाली असून, सततचा अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकर्‍याचे नुकसान होऊ शकते. पिक नुकसानीबाबतची पूर्वसूचना केंद्र शासनाने विकसित केलेल्या उीेि खर्पीीीरपलश अिि किवा विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचे जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालये, विमा कंपनीचा  ई-मेल, संबंधित बँक किंवा कृषी/ महसूल विभाग याद्वारे देण्यात यावी.
रायगड व पालघर जिल्हयातील शेतकर्‍यानी भारतीय कृषी विमा कंपनी तर ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.  या विमा कंपन्याच्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा. पीक कापणी करून सुकण्यासाठी ठेवलेले असताना कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यापर्यंत(14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पाऊस यापैकी जे कारण असेल ते नमुद करून नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे.
शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवताना योग्य ती खबरदारी घेऊनच नुकसानग्रस्त क्षेत्राची नुकसान पूर्वसूचना विहीत कालावधीत नोंदवावी, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्याकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button